कार्पण्यदोषोपहतस्वभावः अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ।।७।।
कार्पण्य-दुर्बलता, दैन्य; दोषः-कमकुवतपणा; उपहत-ग्रस्त झालेला; स्वभावः– विशेषता, स्वाभाविक वृत्ती; पृच्छामि-मी विचारत आहे; त्वाम्-तुम्हाला; धर्म-धर्म; सम्मूढ-गोंधळून, मोहग्रस्त; चेताः– अंतःकरणात; यत्-काय; श्रेयः-सर्वतोपरी कल्याणकारक, श्रेयस्कर; स्यात्– असेल; निश्चितम्-निश्चितपणे; ब्रूहि-सांगा; तत्-ते; मे-मला; शिष्यः-शिष्य; ते-तुमचा; अहम्-मी; शाधि-उपदेश करा; माम्-मला; त्वाम्– तुम्हाला; प्रपन्नम्-शरणागत.
माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारीत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा.
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
तात्पर्य : स्वभावतःच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येयप्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवायही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटविल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वणव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. (OM)
असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की, जीवनातील गुंतागुंती सोडविण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यां याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरू आहेत तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे.
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये (३.८.१०) गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे, – यो वा एतदक्षरं गार्ग्यविदित्वास्माँल्लोकात्यैति स कृपणः – “मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवीत नाही आणि आत्मसाक्षात्काराचे
ज्ञान प्राप्त न करता कुत्र्यामांजरांप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय.” (MANTRA)
जीवासाठी हे मनुष्य-जीवन म्हणजे एका अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्यायोगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण आहे. उलटपक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडविण्याइतपत बुद्धिमान असतो. य एतदक्षरं गार्गि विदित्वास्माँल्लोकाटौति स ब्राह्मणः।
देहात्मबुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. “त्वचा रोगाच्या” आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर उदाहरणार्थ, आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की, तो आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा त्याला वाटते की, आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुंमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. (UPDESH)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की, आपल्या कुटुंबियांबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचविण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की, आपल्याकडून युद्धकर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरू भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारीत होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरू आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते.
आणि म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरूसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावयाचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरू आहेत आणि गीता आणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्येच सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की, मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही तर श्रीकृष्णांमधील ‘अजन्मा तत्त्वाला’ शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांच्या आंतर व बाह्य स्वरूपांमध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच होय. (SHANTI)
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्-
यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ।।८।।
न-नाही; हि-खचितच; प्रपश्यामि-मला दिसते; मम-माझ्या; अपनुद्यात्-दूर करू शकेल; यत्-जो; शोकम्-शोक; उच्छोषणम्-कोरडे पाडणारा; इन्द्रियाणाम्-इंद्रियांना; अवाप्य-प्राप्त होऊन; भूमौ-पृथ्वीवर; असपत्नम्-प्रतिस्पर्धा नसलेले; ऋद्धम्-समृद्ध किंवा वैभवशाली; राज्यम्-राज्य; सुराणाम्-देवांचे; अपि-सुद्धा च-आणि; आधिपत्यम्-स्वामित्व.
ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही.
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
तात्पर्य : धर्मतत्त्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले. परंतु असे प्रतीत होते की, आपले आध्यात्मिक गुरू भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच पडत होते त्या शुष्क प समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरूविना आपल्या अडचणी सोडविणे त्याला अशक्यप्राय झाले. (VED)
जीवनातील समस्या सोडविण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरू या बाबतीत साहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की, जो पूर्णपणे कृष्णभावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरू आहे कारण, तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्रीचैतन्य महाप्रभू सांगतात की, एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी, जर तो कृष्णभावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरू आहे.
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
किवा विप्र, किवा न्यासी, शुद्र केने नय।
येइ कृष्णतत्त्ववेत्ता, सेइ ‘गुरु’ हय ।।
“एखाद्या व्यक्तीचे विप्र (वैदिक ज्ञानातील विद्वान) असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही. परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण-विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरू होय.” (चैतन्य चरितामृत मध्य८.१२८) म्हणून कृष्णभावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरू बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की, (DRAUPADI)
षट्कर्मनिपुणो विप्रो मन्त्रतन्त्रविशारदः ।
अवैष्णवो गुरुर्न स्याद् वैष्णवः श्वपचो गुरुः ।।
“वैष्णव किंवा कृष्णभावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यावाचून संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरू बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्णभावनाभावित असल्यास आध्यात्मिक गुरू बनण्यास योग्य आहे.” (पद्मपुराण) (SHRUTI)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्र आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. तरीसुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांनी श्रीकृष्णांचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे (कृष्णभावनाभावित व्यक्ती) किंवा कृष्णविज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत यांसारख्या शास्त्रांद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. (ARJUN)
आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोर्यामुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की, पृथ्वीवरील प्रतिस्पर्धिविरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्णभावनेचा आश्रय घेतला. शांती व समाधानप्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. (SMRUTI)
अध्याय दुसरा भाग : 3 (सांख्ययोग)
आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्याइतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीताही याची पुष्टी करते की, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति – ‘जेव्हा पुण्यकर्माच्या फलांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीइतपत पतन होते.’ जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. (KRISHNA)
यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्णभावनामृताचा मार्ग आहे. TO BE CONTINUE….