क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ।।३।।
क्लैव्यम्-नपुंसकत्व; मा स्– नको; गमः-प्राप्त होऊ; पार्थ-हे पार्थ (पृथापुत्र); न-कधीही नाही; एतत्-या; त्वयि-तुझ्या ठिकाणी; उपपद्यते-शोभनीय, योग्य; क्षुद्रम्-क्षुद्रः हृदय-हृदयाचे; दौर्बल्यम्-दौर्बल्य, कमकुवतपणा; त्यक्त्वा-सोडून; उत्तिष्ठ– ऊठ; परन्तप=हे परंतप (शत्रूला त्रस्त करणारा).
हे पार्थ! अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप ! ऊठ. (KRISHNA)
अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
तात्पर्य : अर्जुनाला या ठिकाणी पृथेचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णांचे पिता वसुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरताच क्षत्रिय राहतो आणि जर एखादा ब्राह्मणपुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र होत.
म्हणून अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रियपुत्र होऊ नये, अशी श्रीकृष्णांची इच्छा होती.अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते; परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्तीकारक कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. (ARJUN)
आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलच्या आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील, पण श्रीकृष्णांच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्यच आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंतांनी संमती दिलेली नाही. म्हणून श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तींनी अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा यांचा त्याग केला पाहिजे.
अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
अर्जुन उवाच
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ।।४।।
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; कथम्-कसे; भीष्मम्-भीष्म; अहम्-मी; संख्ये-युद्धामध्ये; द्रोणम्-द्रोण; च-सुद्धा; मधुसूदन- हे मधुसूदन; इषुभिः– बाणाद्वारे; प्रतियोत्स्यामि-उलट प्रहार करू; पूजा–अहीँ-जे पूजनीय आहेत त्यांना; अरि-सूदन-हे शत्रुसंहारक, अरिसूदन. (DRAUPADI)
अर्जुन म्हणालाः हे अरिसूदन ! हे मधुसूदना ! मला पूजनीय असणाऱ्या भीष्म, द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन?
अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
तात्पर्य : पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की, ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वादसुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरू सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत.
गुरूनहत्वा हि महानुभावान्श्रे
यो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ।।५।।
गुरून्-ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजन; अहत्वा-हत्त्या न करता; हि-निश्चितच; महानुभावान्– महात्म्यांना; श्रेयः-श्रेयस्कर; भोक्तुम्-जीवनाचा उपभोग घेणे; भैक्ष्यम्-भिक्षा मागून; अपि-जरी; इह-या जीवनामध्ये; लोके-या जगात; हत्वा-हत्त्या करून; अर्थ-प्राप्ती; कामान्-इच्छेने; तु– पण; गुरून्-ज्येष्ठ व्यक्तींना; इह-या जगतात; एव-निश्चितपणे; भुञ्जीय-भोगावेच लागेल; भोगान्-भोग्य वस्तूः रुधिर-रक्ताने; प्रदिग्धान्-माखलेले, रंजित. (VED)
महात्मासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्त्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील.
अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
तात्पर्य : धर्मग्रंथातील नियमांनुसार जो गुरू निंद्यकर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे, केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरू म्हणून आपली आदरणीयता गमावली होती; पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की, ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्त्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे. (SHANTI)
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषाम
स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥६॥
न-नाही; च-सुद्धा; एतत्-हे; विद्यः-आम्हाला माहीत आहे; कतरत्-कोणते; नः– आमच्यासाठी; गरीयः-श्रेयस्कर किंवा उत्तम; यत् वा-अथवा; जयेम-आम्ही जिंकू; यदि-जरी; वा-किंवा; नः आम्ही; जयेयुः-ते जिंकतील; यान् ज्यांना; एव– खचितच; हत्वा=हत्त्या करून; न-कधीच नाही; जिजीविषामः-आम्ही जगू इच्छितो; ते-ते सर्वजण; अवस्थिताः-उभे आहेत; प्रमुखे-सामोरे; धार्तराष्ट्राः– धृतराष्ट्राचे पुत्र.
त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्त्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरीदेखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत.
अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
Listen to this BLOG in AUDIO FORMAT by clicking here, and don’t forget to SUBSCRIBE to our channel for more exciting content!
तात्पर्य : जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की, युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते, आणि विजयाचीही शाश्वती नव्हती. कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहात असली (त्यांची बाजू समर्थनीयच आहे) तरी धृतराष्ट्रपुत्रांच्या मृत्यूमुळे त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते.
अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की, तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर व इंद्रियांवर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्मला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय.
अध्याय दुसरा भाग : 2 (सांख्ययोग)
हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण (त्याचे आध्यात्मिक गुरू) यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवितो की, तो खऱ्या अथनि सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की, अर्जुन हा मोक्षप्राप्तीला सर्वथा योग्य होता. जोपर्यंत इंद्रियनिग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्षप्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती; परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते. TO BE CONTINUE….